रजनीश वाणी: भाग 33.
व्यक्ती,जेवढा बुद्धिमान होईल तेवढी स्वतःच्या पद्धतीने जगण्याची त्याची इच्छा होईल.फक्त बुद्धिहीन व्यक्तीवर वरून लादल्या गेलेले नियम प्रतिक्रिया, रिएक्शन निर्माण करणार नाहीत.म्हणून जग जेवढे बुद्धिहीन होते तेवढे वरून लादल्या गेलेल्या नियमांच्या विरोधात क्रांती नव्हती. जेव्हापासून जग बुद्धिमान होत चालले आहे, क्रांतीची सुरुवात झाली आहे .सगळीकडे नियम तोडले जात आहेत.मनुष्याचा वाढत असलेला जो विवेक आहे, त्याला स्वतंत्रता पाहिजे आहे.स्वातंत्र्याचा अर्थ स्वच्छंदता नाही, पण स्वातंत्र्याचा अर्थ हा आहे की मला आपल्या व्यक्तित्वाची स्वतंत्रता, पूर्ण निर्णय घेण्याची स्वयंव्यवस्था हवी आहे.आपली व्यवस्था हवी आहे.तर अनुशासनाची जुनी सर्व परंपरा एकदम खड्ड्यात येऊन उभी राहिली आहे. ती आता तुटेलच.तिला पुढे नेण्याचे प्रयत्न केले जाऊ शकत नाहीत. तिला पुढे चालवण्याचे प्रयत्न करू नये कारण जेवढे आपण तिला चालवण्याची इच्छा करू तेवढ्याच तीव्रतेने आपली मनो प्रेरणा तिला तोडण्यासाठी आतुर होईल आणि तिला तोडण्याची आतुरता बिलकुल स्वाभाविक आणि उचित आहे.हे चूकही नाही.तर आता एका नवीन अनुशासनाच्या विषयाबद्दल...