ओशो वाणी भाग 18
ओशो वाणी भाग 18. तिसरा स्तर आपल्या वेदनांचा आहे, आपल्या संवेदनांचा आहे .24तास आपण कुठल्या ना कुठल्या संवेदनांनी घेरलेले असतो एकतर आपण सुखाने घेरलेले असतो किंवा दुःखाने वेढलेले असतो.जेव्हा दुःख असते, तेव्हा आपण दुःखापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि आणि सुखाची आकांक्षा करतो. हेच आपले टेन्शन, हीच आपली समस्या असते ,हाच आपला त्रास असतो. जेव्हा सुख येते, तेव्हा आपल्या मनात ही भीती निर्माण होते की पुन्हा दुःख तर येणार नाही? म्हणून आपण सुखाला पकडून ठेवण्याची इच्छा करतो,आणि दुःखाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा टेन्शन,त्रास आणि तणाव कायम राहतो. माणूस खूप विचित्र परिस्थितीत आहे. दुःख असेल तेव्हा तो दुःख सहन करतो, यासाठी दुःख सहन करतो कि दुःख आहे आणि ते दूर व्हावे,आणि सुख असेल तर यासाठी दुःखी होतो की सुख तर आहे,पण दुःख येऊ नये. दुःख बाहेर राहावे आणि सुख कायम राहावे. सुखाला पकडू इच्छितो, दुःखाला दूर हटवायला पाहतो. दुःखाला दूर करण्यात आणि सुखाला पकडण्यात ,दोन्ही परिस्थितीत उत्तेजना निर्माण होते. दुःखही एक उत्तेजना आहे ,ती व अप्रितिकर उत्तेजना आहे.सुख ही एक उत्ते