Posts

ओशो वाणी: भाग 30.

 तुमच्याकडे संवेदनशील इंद्रिये आहेत, पण तुम्ही संवेदना हरवून बसला आहात.तुमच्यातील संवेदनशील अंश जवळपास संवेदना शून्य ,मृत आहेत.ते तुमच्या शरीरावर आहेत फक्त पण त्यात ऊर्जा प्रवाहित होत नाही आहे.ते तुमच्या अस्तित्वाचे जिवंत अंग राहिले नाहीत .तुमच्या आत काहीतरी मृतप्राय होऊन गेले आहे.ते थंड, अवरुद्ध होऊन गेले आहे.हजारो वर्षांच्या दमनामुळे संपूर्ण मानव जाती सोबत हे घडले आहे,आणि शरीराच्या विरोधात चालत आलेल्या विचारधारा आणि संस्कार बद्धतांच्या हजारो वर्षांनी तुम्हाला पंगू बनवून टाकले आहे.तुम्ही फक्त नावालाच जिवंत आहात.आता  सर्वात पहिले काम हेच करावे लागेल, तुमच्या संवेदी अंगांना वास्तविक रूपात जिवंत आणि संवेदनशील असले पाहिजे,केवळ तेव्हाच त्यांच्यावर स्वामीत्व निर्माण होऊ शकेल.तुम्ही पाहता, पण वस्तूंना खोलवर नाही पाहू शकत.तुम्ही वस्तूंना फक्त वरवर, त्यांचा पृष्ठभाग तेवढा पाहता.तुम्ही स्पर्श करता, पण तुमच्या स्पर्शात उष्णता नसते.तुमच्या स्पर्शाने आत आणि बाहेर काहीही निर्माण होऊ शकत नाही,प्रवाहित होत नाही.तुम्ही ऐकताही.पक्षी गीत गात आहेत,आणि तुम्ही ऐकता आणि तुम्ही म्हणू शकता की होय, मी ऐकत आहे

ओशो वाणी भाग 29.

 मृत्यूची घटना अतिशय रहस्यमय आहे, आणि त्याच प्रमाणे आत्महत्येची घटनाही.पृष्ठभागावरून हे निश्चित करू नका की आत्महत्या काय आहे?अनेक गोष्टी असू शकतात.मला स्वतःला असे वाटते की जे लोक आत्महत्या करतात हे या जगातील खूप संवेदनशील, खूप प्रतिभावान लोक आहेत.त्यांच्या संवेदनशील आणि प्रतिभावान असल्यामुळे त्यांचा या विक्षिप्त जगाशी ताळमेळ बसू शकत नाही.समाज विक्षिप्त आहे,तो विक्षिप्त पायावर आधारलेला आहे.त्याचा सर्व इतिहास वेडेपणा, हिंसा, युद्ध आणि विध्वंसाचा आहे.कुणी म्हणते की माझा देश जगातील महानतम देश आहे,आता ही विक्षिप्तता आहे.कुणी म्हणतो की माझा धर्म जगातील महानतम आणि सर्वश्रेष्ठ धर्म आहे, आता ही विक्षिप्तता आहे आणि ही विक्षिप्तता रक्त मास मज्जा या पर्यंत जाऊन पोहोचली आहे.आणि लोक खूप खूप निस्तेज आणि संवेदनाहीन झाले आहेत.त्यांना व्हावे लागते, नाहीतर जगणे मुश्किल होऊन जाते.या चारी बाजूंना पसरलेल्या संवेदनाहीन समाजात तुम्हालाही संवेदनाहीन होऊन जावे लागते.अन्यथा तुम्ही प्रवाहाच्या बाहेर जाऊ लागता.जर तुम्ही समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊ लागलात तर समाज समजतो की तुम्ही वेडे झाला आहात .खरे तर समाज वे

ओशो वाणी भाग 28

 मनुष्याने स्वतःचे एक जग बनवले आहे.. निसर्गाच्या विपरीत असे एक जग मनुष्याने बनवले आहे.सिमेंटचे रस्ते ,सिमेंटची घरे ,सिमेंटची जंगले मनुष्याने बनविली आहेत,ज्यात ही खबरच मिळत नाही की परमात्मा ही आहे.मोठ्या नगरांमध्ये परमात्मा जवळजवळ मेला आहे कारण परमात्म्याची खबर फक्त तिथेच मिळू शकते जिथे गोष्टींची वाढ होत असते.रोप मोठे होते तर ते खबर देते की ते जिवंत आहे .आता कुठली इमारत ,कुठले घर तर वाढत नाही.ते जसे आहे तसेच राहते.सिमेंटचा रस्ता तर काही वाढत नाही .जसा आहे तसाच राहतो ,मृत आहे. जीवनाचे लक्षण काय आहे? वाढणे, वृद्धी.वर्धमान होणे हे जीवनाचे लक्षण आहे.आम्ही एक मृत जग बनवले आहे.मशीन वाढत नाही,घरे वाढत नाहीत ,सिमेंटचे रस्ते वाढत नाहीत,सर्व मृत आहेत ,सर्वकाही थांबलेले आहे.या थांबलेल्या अवस्थेत आम्हीही जगत आहोत, आम्ही ही थांबलेले आहोत.या? ज्यांच्या सोबत आपण राहतो तसेच आपणही होऊन जातो.मनोवैज्ञानिक म्हणतात की जो माणूस यंत्रांसोबत काम करतो तो शेवटी यंत्रच होऊन जातो.आणि होऊन जातोच .हे बिलकुल स्वाभाविक आहे . आमचे कृत्य हळूहळू ,हळूहळू आपल्या सवयी बनवत.तेच आपल्याला घेरून टाकते.माणसाने जे एक सिमेंट आणि ल

ओशो वाणी भाग27

 मनुष्याच्या वासना तोपर्यंत त्याला पकडून ठेवतात तोपर्यंत त्याच्याकडे संकल्प, विल नाही .जोपर्यंत त्याच्याजवळ  संकल्प सारख्या सत्तेचा जन्म झाला नसेल या संकल्प बाबत थोडे खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. कारण त्याच्याशिवाय कोणीही मनुष्य आपल्या वासनांना वश करू शकत नाही. संकल्पचा काय अर्थ आहे? संकल्पचा अर्थ इंद्रियांचे दमन नाही. संकल्प चा अर्थ स्वतःच्या होण्याचा अनुभव आहे. संकल्पचा अर्थ आहे स्वतःच्या असण्याचा अनुभव .तुम्हाला भूक लागली आहे, तुमचे शरीर म्हणते मला भूक लागली आहे .तुम्ही म्हणता की हो,मी ऐकले आहे,पण आत्ताच मी राजी नाही जेवण करण्यास.आणि तुम्ही जर हे पूर्ण मनापासून म्हणू शकला, की मी आत्ताच जेवण करण्यासाठी राजी  नाही,तर शरीर तत्काळ त्याची मागणी बंद करते. तत्काळ मागणी बंद करते. ज्या क्षणी शरीराला माहीत होते की तुमच्यापाशी शरीराच्या वर असा संकल्प आहे, तेव्हा शरीर तत्काळ मागणी बंद करते. तुमची कमजोरी च शरीराची ताकद बनते आणि तुमची ताकद हीच शरीराची कमजोरी बनते. पण आपण कधी शरीरापासून भिन्न आहोत अशी घोषणा करत नाहीत. कधी कधी छोटे छोटे प्रयोग करून बघणे गरजेचे आहे.खूप छोटे प्रयोग, ज्यामध्ये त

ओशो वाणी भाग 26.

 चित्ताची ही सवय आहे की त्याला कोणता ना कोणता आधार हवा असतो.चित्ताला आपल्या जीवनासाठी भोजन हवे असते.ते आधार मागत असते. कुठलातरी आधार पाहिजे.राम राम जपत असाल तर चित्ताला खूप प्रसन्नता आहे,काहीही हरकत नाही. कुठले भजन गात राहाल तर चित्ताला कुठलीच कठीणता नाही. त्याला कुठले ना कुठले भोजन मिळाले तर ते अस्तित्वात राहील, आणि ते टिकून राहिले तर आत्म्याचा अनुभव होऊ शकणार नाही. तर त्याचे भोजन हिरावून घ्यायचे आहे, त्याला निराधार करावयाचे आहे.हीच आपली साधना आहे.आता आपणच त्याला आधार दिला तर तर चित्त तर खूप प्रसन्नतेने त्याचा स्वीकार करेल. एक आधार दिला तर थोड्या कमी प्रसन्नतेने, जास्त आधार दिला तर जास्त प्रसन्नतेने. चंचलतेमध्ये चित्त खूप प्रसन्न राहते.  ध्याना त  त्याला अडचण वाटायला लागते कारण आपण त्याचा आधारच हिरावून घेत  आहोत. तुम्हाला ही गोष्ट समजली ना? ते बिना आधाराचे राहूच शकत नाही. त्याला आपल्या मरणाची भीती वाटते .आणि ते बिलकुल स्वाभाविक आहे. आणि हीच तपश्चर्या आहे की जेव्हा ते आधार मागत असेल तेव्हा आपण साहस करून त्याला आधार देऊ नये. तर हे होऊ शकेल की सुरुवातीला आपण आधार न देता ही ते आधार पकडेल.

ओशो वाणी भाग 25

 संसाराला चिखल समजाल, तर इथूनच चुकीला सुरुवात झाली. संसारात फुललेली कमळे तुम्हाला दिसत नाहीत? बुद्ध कुठे उमलले? महावीर कुठे उमलले? कबीर कुठे उमलले? हे ज्या जगजीवनच्या सूत्रांवर आपण विचार करीत आहोत ते जगजीवन कुठे उमालले? ते सूत्र कुठे जन्मले? हे जगजीवन चे गीत कुठे उमटले?याच संसारात, याच चिखलात. तर चिखलाला फक्त चिखल म्हणू नका त्यात कमळे ही असतात. चिखल कमळाची जननी आहे, त्याचा सन्मान करा. चिखलाशिवाय कमळ कुठे? चिखलाला सोडून पळून जाल तर मग कमळ कसे जन्मेल? चिखलाचा उपयोग करा. कमळ चिखलाची संभावना आहे. कमळ चिखलात  दबुन पडले आहे. शोधा ,तपास करा,भेटेल.भेटले आहे.तुम्हालाही भेटेल. पळून कुठे जाल?चिखलापासून पळून गेलात तर लक्षात ठेवा कमळापासूनही पळून गेलात. लक्षात ठेवा, सुकून जाल,सडून जाल, पण सुगंध कधीही येणार नाही. म्हणून मी म्हणतो,संसारातून पळून जाणे हा पळपुटेपणा आहे ,पलायन आहे. संसाराचा उपयोग करा. संसार एक अवसर आहे ,महान अवसर आहे.एक आव्हान, जिथे प्रत्येक क्षणी परमात्मा तुम्हाला जागे करण्याचे किती आयोजन करत आहे. कुणाच्या तोंडून शिवी निघते तुमच्यासाठी.जर तुम्ही समजदार असाल तर ही शिवी तुम्हाला जागे करे

ओशो वाणी भाग 24

 तुम्ही कधीच निश्चित नसता, कारण निश्चय केंद्रित होण्याने येत असतो. तुम्ही स्वतःच्या बाबतीतच निश्चित नाहीयेत, आणि दुसर्यां संबंधी निश्चित होने तर असंभवच आहे, जेव्हा तुम्ही स्वतः संबंधीच अनिश्चित आहात. तुम्ही स्वतः संबंधी अस्पष्ट, अन्धूक अन्धूक आहात.  काही दिवसां पूर्वी एक व्यक्ति इथे आला होता. त्याने मला सांगितले कि मी कुण्या मुलीवर प्रेम करतो आणि मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे.  मी काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोल वर पहात राहिलो.. काहीही न बोलता. तो बेचैन झाला, मग त्याने विचारले, "तुम्ही मला असे का पहात आहात? मला अजब वाटत आहे" मग त्याने विचारले, "तुम्हाला काय वाटते, माझे प्रेम खोटे आहे? "तरी मी काही बोललो नाही. त्याला पहातच राहिलो. आणि तेव्हा त्याने विचारले, " तुम्ही असे का समजता कि हा विवाह योग्य होणार नाही? आणि तो स्वतःच म्हणाला कि, "मी स्वतः या गोष्टी वर फार विचार केला नव्हता. आणि हेच कारण आहे कि मी आपल्या कड़े आलो आहे. मला माहित नाही कि मी प्रेमात आहे सुद्धा की नाही. " मी एक ही शब्द बोललो नव्हतो. मी फक्त त्याच्या डोळ्यांत डोकवून पहात होतो. पण