रजनीश वाणी; भाग 34.
संत सुंदरदास म्हणतात.. गोविंद के किये जीव जात है रसातल कौं .. गुरु उपदेशे सु तो छुटे जम फंद तें .. गोविंद के जीव बस परे कर्मानी कै .. गुरु के निवाजे सो फिरत है स्वच्छंद तै!! खूप अद्भुत वचन आहे.. सुंदर दास म्हणतात.. गोविंद के किये जीव जात है रसातल कौं.. गोविंदाने बनवले आहे लोकांना..आणि लोक नरकात जात आहेत. गुरुउपदेश सु तो छुटे जम फंद तें.. गुरुचा उपदेश ऐकाल तर मृत्यूच्या फासातून सुटका होईल, फाशी टळेल. गोविंद के किये जीव बस परे कर्मणी के.. गोविंदाने बनविलेले जीव..आणि कर्माच्या फेऱ्यात पडले आहेत, वासनांमध्ये गुंतले आहेत, इंद्रियांमध्ये गुंतले आहेत, हजार प्रकारच्या कारागृहांमध्ये पडले आहेत. गुरु के निवाजे सो फिरत है स्वच्छंद तें.. परंतु ज्याला गुरुने वाचवले,तो मुक्त होऊन, स्वतंत्र बनून, स्वच्छंद बनून फिरत आहे ,विचरत आहे.ते असे म्हणत आहेत की जरा बघा तर..गोविंदाने बनविलेल्या जीवाची अशी गत होत आहे. ज्याच्यावर गोविंदाच्या हाताची छाप आहे, तो भटकत आहे.पण ज्याच्यावर गुरुचा हात पडला, तो वाचला. असे समजू नका की सुंदर दास गोव...