Posts

रजनीश वाणी भाग 18

 रजनीश वाणी भाग 18.                          तिसरा स्तर आपल्या वेदनांचा आहे, आपल्या संवेदनांचा आहे .24तास आपण कुठल्या ना कुठल्या संवेदनांनी घेरलेले असतो एकतर आपण सुखाने घेरलेले असतो किंवा दुःखाने वेढलेले असतो.जेव्हा दुःख असते, तेव्हा आपण दुःखापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि आणि सुखाची आकांक्षा करतो. हेच आपले टेन्शन, हीच आपली समस्या असते ,हाच आपला त्रास असतो. जेव्हा सुख येते, तेव्हा आपल्या मनात ही भीती निर्माण होते की पुन्हा दुःख तर येणार नाही? म्हणून आपण सुखाला पकडून ठेवण्याची इच्छा करतो,आणि दुःखाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा टेन्शन,त्रास आणि तणाव कायम राहतो. माणूस खूप विचित्र परिस्थितीत आहे. दुःख असेल तेव्हा तो दुःख सहन करतो, यासाठी दुःख सहन करतो कि दुःख आहे आणि ते दूर व्हावे,आणि सुख असेल तर यासाठी  दुःखी होतो की सुख तर आहे,पण दुःख येऊ नये. दुःख बाहेर राहावे आणि सुख कायम राहावे. सुखाला पकडू इच्छितो, दुःखाला दूर हटवायला पाहतो. दुःखाला दूर करण्यात आणि सुखाला पकडण्यात ,दोन्ही परिस्थितीत उत्तेजना निर्म...

रजनीश वाणी भाग 17

 रजनीश वाणी भाग 17.                        जीवनात दुःखही आहे आणि सुखही. कारण जन्मही आहे,आणि मृत्यूही.पण या गोष्टीवर बरेच काही अवलंबून आहे, की दोन्हीपैकी आपण कुणाची निवड करून जीवनाचा पाया रचतो? जर कोणी व्यक्ती मृत्यूची निवड करून जीवनाचा पाया रचत असेल,तर मग जन्मही केवळ मृत्यूची सुरुवात वाटेल. आणि जर कुणी जीवनाची निवड करून पाया रचत असेल तर मग मृत्यूही जीवनाची परिपूर्णता आणि जीवनाचा शेवटचा बहार वाटू लागतो.जर एखादा व्यक्ती दुःखाला जीवनाचा आधार म्हणून  निवडत असेल तर सुख ही फक्त दुःखात जाण्याचा उपाय दिसू लागेल आणि जर एखादा व्यक्ती सुखाला जीवनाचा आधार बनवेल तर दुःखही केवळ एका  सुखातून दुसऱ्या सुखात परिवर्तन होण्याची मधली कडी वाटू लागेल. हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. जीवनात दोन्ही आहे, आपण कशाची निवड करतो याने संपूर्ण जीवनाची व्यवस्था बदलून जाते.जीवनात अशांती आहे, शांती ही आहे. आपण कशाची निवड करतो यावर सर्व काही अवलंबून असेल. ध्यान अशांती ला जीवनाच्या आधारापासून हटवण्याची विधी आहे आणि जीवनाच्या आधारात मौन आणि शांती ठेवण...

रजनीश वाणी भाग 16

 रजनीश वाणी भाग 16.                         समस्या तर आहेत,समस्या चारी बाजूंना आहेत,पण तुम्ही स्वतः समस्या नाहीत. तुम्ही त्यांच्या पार जाऊ शकता. तुम्ही त्यांना एका दृष्ट्या प्रमाणे अशाप्रकारे पाहू शकता , जसे तुम्ही शिखरावर उभे राहून दरीमध्ये वाकून पहात आहात. दृष्टा होऊनच तुम्ही समस्यांचे समाधान करू शकता. वास्तविक पाहता एखाद्या समस्येचे दृष्टा होण्यातच ती समस्या अर्धी सुटून जाते,कारण जेव्हा तुम्ही तिला पाहू शकता, तिचे तटस्थ अवलोकन करू शकता, तेव्हा तुम्ही तिच्यापासून बिलकुल दूर राहू शकता, अस्पर्शित राहू शकता.तर तुमच्या डोळ्यात एक स्पष्टता येते.ती स्पष्टता तुम्हाला ही समस्या सोडविण्याची किल्ली प्राप्त करून देते आणि अधिकांशतः  तर साऱ्या समस्या अस्तित्वातच यासाठी असतात की आपल्या जवळ ती स्पष्टता नसते जिने आपण त्यांना समजून घेऊ शकतो. तुम्हाला समस्येच्या समाधानाची आवश्यकता नाही,स्पष्टतेची आहे. समस्येला जर योग्य प्रकारे समजून घेतले गेले, तर ती सुटू शकते कारण समजदारी च्या अभावामुळे समस्या निर्माण होते.तुम्ही समस्या निर्माण...

रजनीश वाणी भाग 15

 रजनीश वाणी भाग 15.                        जे लोक जीवनात लीन होतात आणि आणि जे जीवनाला पूर्णपणे पिऊन घेतात, जे जीवनाला पूर्णपणे आत्मसात करतात, ते जीवनाचा साक्षात्कार पण करू शकतात.ही गोष्ट थोडी समजून घेणे आवश्यक आहे कारण जी गोष्ट याच्या पूर्णपणे विरोधी आहे, त्याची मुळे आपल्या खूप खूप खोलवर गेलेली आहेत.जीवनाला सर्व बाजूंनी सोडून देण्याचा, त्याचा त्याग करण्याचा भाव हजारो वर्षांपासून आपल्या मध्ये आहे. तो खूप खोलवर आपल्या अन कॉन्शस पर्यंत, आपल्या अचेतन मनापर्यंत प्रविष्ट झालेला आहे. भोजन करावयाचे असेल तर अस्वादाने भोजन करावे, स्वाद घेणे पाप आहे. शिक्षक समजावतात की स्वाद घेणे पाप आहे. अस्वाद. स्वाद घेऊ नका, संगीत ऐकू नका. कारण संगीता चा रस तर इंद्रियाचे सुख आहे. कानाचे सुख आहे. सौंदर्य पाहू नका, कारण सौंदर्य..सौंदर्य तर रूप आहे .डोळे फोडून घ्या, तर तुम्ही त्यागी आहात कारण सौंदर्य तर रूप आहे, डोळ्यांचे सुख आहे. ही तर सगळी इंद्रियांची सुखे आहेत. या सर्वांना सोडून द्या, या सर्वांचा त्याग करा,आणि इंद्रियांचे सर्व द्वार बंद केले गेले ...

रजनीश वाणी भाग, 14

 रजनीश वाणी भाग 14.                          या जगात प्रत्येक व्यक्तीच्या असण्याचे एक प्रयोजन आहे, एक लक्ष्य आहे, जे त्याला पूर्ण करावयाचे आहे. पण प्रत्येक व्यक्ती मनातून अनेक खंडांमध्ये विभागला गेलेली आहे, कारण त्याला आपल्या लक्ष्याचा बोध नाही. त्याचे संपूर्ण चित्त त्या उसण्या घेतलेल्या लक्ष्यानी भरलेले आहे जे दुसऱ्यांनी त्याला दिलेले आहेत. जर तुम्ही हे जाणत नसाल की तुमच्या असण्याचे, तुमच्या अस्तित्वाचे काय लक्ष्य आहे ?जर तुम्ही हे जाणत नसाल की वास्तवात तुम्हाला काय व्हायचे आहे ,आणि काय करावयाचे आहे? तर सगळं काही एक दिशा भ्रम बनून जाते. कधी तुम्ही तिकडे ओढले जाता, तर कधी इकडे.तुम्ही वेगवेगळ्या दिशांना भटकत राहताआणि हेच संपूर्ण विषादाचे कारण आहे. तुम्ही एवढ्या दिशांमध्ये विभक्त झालेले आहात की तुमचे संपूर्ण व्यक्तित्व खंड खंड होऊन गेले आहे.एक खंड उत्तरेच्या दिशेने जात आहे,तर दुसरा खंड दक्षिणेकडे. तुम्ही सतत एका संघर्षांमध्ये जगत आहात. तुम्हाला हे माहीतच नाही की तुम्ही कोणत्या दिशेला जात आहात, कारण तुमचे कोणतेही एक व्यक...

रजनीश वाणी भाग 13

 रजनीश वाणी भाग 13.                          एक प्रामाणिक चित्त, एक ऑथेन्टीक माईंड असले पाहिजे. आमचे सारे चित्त औपचारिक आहे, फॉर्मल आहे, प्रामाणिक नाही. ना आपण कधी प्रामाणिक रूपाने प्रेम केले आहे, ना प्रामाणिकपणे कधी घृणा केली आहे, ना प्रामाणिकपणे क्रोध केला आहे, ना कधी प्रामाणिक रूपाने कुणाला क्षमा केली आहे. आमच्या चित्ताचे सारे आवर्तन,आमच्या चित्ताचे सारे रूप औपचारिक आहे, खोटे आहे, मिथ्या आहे.आता मिथ्या चित्ताला घेऊन जीवनाचे सत्य कुणी कसे जाणून घेऊ शकेल? सत्य चित्ताला घेऊनच जीवनाच्या सत्याशी संबंधित होता येईल.आमचे सर्व माईंड, आमचे सर्व चित्त, आमचे सर्व मन मिथ्या आणि औपचारिक आहे हे समजून घेणे उपयोगी आहे. सकाळी सकाळी आपण आपल्या घराच्या बाहेर आला आणि रस्त्यावर तुम्हाला कुणी दिसले आणि तुम्ही त्याला नमस्कार केला,  तुम्ही त्याला म्हणता की तुम्हाला भेटून खूप आनंद झाला,तुमचे दर्शन झाले,खूप छान वाटले.पण मनातल्या मनात तुम्ही असा विचार करता कि या दुष्टाचा चेहरा सकाळी सकाळी कुठून दिसला असेल?हे अन ऑथेंटिक माईंड आहे. इथे गैर...

रजनीश वाणी भाग 12

 रजनीश वाणी भाग"12                     माझी धारणा खूप वेगळी आहे, तिला समजून घ्याल तर एक नवीन दृष्टी मिळू शकते.जेव्हा एक माणूस धनाच्या शोधात असेल, तर आपण असा विचार करतो की तो ईश्वराच्या विरुद्ध शोध घेत आहे.मी असा विचार करत नाही. मी असे समजतो की तो ईश्वराचाच शोध घेत आहे. जेव्हा एक माणूस पदाचा शोध घेत आहे, तेव्हा लोक विचार करतात की तो ईश्वराच्या विपरित  काहीतरी शोधत आहे. मी विचार करतो की तो ईश्वराचाच शोध घेत आहे. आणि मी  त्याला याप्रकारे समजतो.एका माणसाची आपण कल्पना करू, तुमचेच उदाहरण घेऊ. मी जर तुम्हाला म्हणेल की आपण किती धनाने तृप्त व्हाल? तर आपले मन एक आकडा ठरवेल,तत्काळ, आणि पुढे निघून जाईल की एवढ्याने काम चालणार नाही. मी कोणताही आकडा तुम्हाला सांगेन, कुठलीही संख्या ,आणि तुमचे मन म्हणेल की एवढ्याने भागणार नाही. याचा अर्थ काय झाला?याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत अनंत धन भेटणार नाही, तोपर्यंत तुमचे काम चालणार नाही. तुम्हाला मी म्हणेल , की मोठ्यात मोठे पद तुम्ही घ्या. हे पद तुम्ही घ्या आणि यानंतर मागू नका. तुम्ही शेवटचे पद...